दोन फुल्ल एक हाफ

दोन फुल्ल

महाराष्ट्रात वृत्तपत्राचं फार प्रस्थ, लोकांचा जीव की प्राणच अगदी!  मग, यात सदरं असायची, आहेत.चर्चा,भांडणे, विवाद सगळे वृत्तपत्राच्या माध्यमातूनच. पण जेवणात जसे पापड असतात तसे पेपरमध्येही   काहीतरी खमंग, कुरकुरीत पाहिजेच की.  पूर्वी दळवी, नंतर कणेकर असे पापड तळण्यात माहिर होते.  पण दळवी गेले, आणि, कणेकरांचे पापड पचेनासे, रूचेनासे झाले.  पण, जेवणात पापड तर पाहिजेतच.  मग, टीकेकर नामक आच्यार्‍याने आपल्या लोकसत्ता खानावळीसाठी  एका भल्या माणसाला बोलावले.  म्हणाले, ''तळ पापड!'' हा पापड तळू लागला.  पण आपण पापड तळायचे या भीतीने त्याने नाव बदलले .मग आच्यार्‍यानेच   त्याला वेटर केला.  ''तंबी ' म्हणून तो पापड तळू लागला.